कृषि योजना शोधा.....

रविवार, २ एप्रिल, २०२३

शेततळे संपूर्ण नियोजन (प्रश्न-उत्तरे)

शेततळं :


काय आहे शेततळं?

यात आपण पावसाचे पाणी जमा करू शकतो आणि भविष्यात त्याचा वापर करू शकतो.
शेततळ्याचा प्राथमिक उद्देश आहे शेतकऱ्याच्या खरीप पिकांसाठी पाण्याचा सुरक्षित स्त्रोत निर्माण करणे. 
जमिनीच्या भू-गर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाणी मुरवण्याची पध्दत म्हणूनही शेततळ्याचा वापर करता येईल.
या सारख्या बांधणीमध्ये साठ लाख लिटर्स इतकं पाणी साठवता येतं.
शेततळ्यामुळे पिकाच्या गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते, ज्यामुळे चांगले उत्पादनही घेता येतं.

शेततळं कुठे बांधता येईल?

शेततळ्याचे दोन प्रकार आहेत. सामुदायिक शेततळं आणि वैयक्तिक शेततळं
सामुदायिक शेततळं हे साधारणपणे पाणलोटक्षेत्राच्या जवळ निरुपयोगी जमिनीवर किंवा नाल्याजवळील नापिक जमिनीवर खोदता येईल. 
याचा मुख्य उद्देश असेल नाल्यातले पाणी साठवणे अन्यथा जे वाहून जाईल.
साठवलेलं पाणी जमिनीत मुरेल आणि भू-गर्भातल्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल.
विहिरी आणि बोअरवेल यांचे पुनर्भरण होईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल.
वैयक्तिक शेततळं हे साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीत खोदले/ बांधलं जातं.
हे त्यावेळी बांधले जाते ज्यावेळी सिंचनासाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोअरवेल किंवा उपसा सिंचनाचा स्त्रोत नसेल.
अश्यावेळी तो जमिनीच्या त्या भागात शेततळं बांधेल जिथे पाण्याचे प्रवाह एकत्र वाहून येतात.
अश्या शेततळ्यामुळे त्याला त्या जमिनीवर पिक घेण्यासाठी पाण्याच्या पुरवठ्याची खात्री मिळते जी पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पडीक राहून जाईल.
शेततळ्यासाठी जागा कशी निवडावी ?
जी जागा नाल्याच्या बाजूला आहे अश्या जागेला प्राथमिकता द्यावी.
जवळपास कुठेही नाला नसल्यास, तुमच्या शेतातून एखादा अगदी छोटा ओहोळ किंवा जलवाहिनी वहात असेल अशी जागा असू शकेल.
अशी जागा निवडण्यात यावी ज्यात ओहोळामधून वाहून येणारे सर्व पाणी सुलभतेने जमा करता येईल.
शेततळं अश्याही जागांवर बांधता येईल जिथे जवळ असलेल्या मोठ्या नाल्यातून किंवा नदीतून पाण्याची उचल करता येईल.
जमीनीची प्रत महत्वाची ठरते का?
निवडलेल्या जमिनीवरची माती सुलभतेने खोदता येत आहे याची खात्री करा.
जर जमिनीवर मुरूम किंवा कठीण खडक असेल तर जास्त खोल शेततळे खोदणे कठीण होईल आणि या शेततळ्याची साठवण क्षमता खूप कमी असेल.
गाळाची माती चिकणमाती किंवा काळी माती ही शेततळं खोदण्यासाठी उत्कृष्ट आहे.

शेततळ्याचे माप कसं / किती /काय असावं?

सरकारने शेततळ्याचे सात वेगवेगळे नमुने मंजूर केले आहेत.
सर्व प्रकारांमध्ये शेततळ्याची खोली ही तीन मीटर्स इतकी निश्चित केली आहे.
शेततळ्याची लांबी आणि रुंदी पुढील प्रमाणे वेगवेगळी असेल. १५ x १५ मीटर्स, १५ x २० मीटर्स, २० x २० मीटर्स, २० x २५ मीटर्स, २५ x २५ मीटर्स, २५ x ३० मीटर्स आणि ३० x ३० मीटर्स.
शेताची गरज आणि सरकारी योजना ज्यातून निधी प्राप्त होणार आहे या अनुसार विशिष्ट आकार निवडला जाईल.

शेततळे कसे बांधावे?

शेततळ्याचे सर्वसामान्य माप ३०x ३०x ३ मीटर्स इतके घेतले जाते.
यासाठी किमान ४४ x ४४ मीटर्स इतक्या आकाराच्या जागेची गरज आहे.
एकात एक असे तीन चौकोन चिन्हांकित करून बांधकामाची सुरुवात होईल.
सर्वात बाहेरच्या चौकोनाचे माप हे अर्थातच ४४ x ४४ मीटर्स इतके म्हणजे जागेच्या आकाराचे आहे.
३० x ३० मीटर्स आकाराचा दुसरा चौकोन आहे, जो तळ्याच्या चार बाजू चिन्हांकित करतो. 
सर्वात आतला चौकोन २४ x २४ मीटर्सचा आहे. जो तळ्याचा तळ चिन्हांकित करतो.
चौकोन कसे आखावेत?
आतले दोन चौकोन काळजीपूर्वक आखायला हवेत ज्यामुळे ते बरोबर कोनात आहेत याची खात्री मिळेल.
यासाठी प्रथम आपण दोरीने एक तळरेषा निश्चित करायची आहे जी तळ्याच्या चार बाजू पैकी एक बाजू निश्चित करेल.
दगडाचा खुणेसाठी वापर करत आपण ही दोरी या रेषेच्या शेवटी काटकोनात वळवू.
दोरीच्या या वळणाचा कोन काळजीपूर्वक सुस्थित करावा जोवर ३ x ४ x ५ मीटर्सचा त्रिकोण साधला जात नाही.
यामुळे चारही कोपरे हे हवे तसे ९० अंशाचे आहेत याची खात्री मिळेल.

 

ही पध्दत वापरून आपण खडूने पहिल्यांदा बाहेरचा ३० x ३० मीटर्सचा चौकोन आणि त्यानंतर आतला २४ x २४ मीटर्स चा चौकोन आखून घेवू.
चौकोन कसे खोदावे?
सर्वात आधी आतला २४ x २४ मीटर्सचा चौकोन खोदून सुरुवात करा.
हा तीन मीटर्स खोलीचा अचूक चौकोनी आकार खोदून घ्यावा.

 

या नंतर मशीन जमिनीच्या पातळीवर आणा आणि काळजीपूर्वक भिंती खरवडून चारही बाजुकडून तळापर्यंत उतार तयार करा. 

खोदून काढलेल्या मातीचे काय करायचे?

खोदून काढलेली माती ही शेततळ्याच्या चारही बाजूना जमा करावी.
तळ्याच्या चारही बाजूच्या आणि बांधाच्या मध्ये कुठेही वाट अथवा रिकामी जागा ठेवू नये.

 

या मातीच्या ढीगाची उंची २ मीटर्स आणि याची तळ बाजू ४ मीटर्स असावी.

 

खोदकाम योग्य पध्दतीने झालेले आहे याची खात्री कशी करता येईल?
तळ्याची लांबी रुंदी आणि खोली यांचे आकारमान योग्य मापात झाले आहे हे तपासण्यासाठी बांधाच्या लांबी आणि रुंदीचे मोजमाप करा.
ते ३४ x ३४ मीटर्स या मापात असायला हवे.
तळ्याच्या बाजू या ३० x ३० मीटर्स आणि तळ्याच्या तळाच्या बाजूचे माप २४ x २४ मीटर्स या मापात असावे.
उतार व्यवस्थित केले गेले आहेत हे तपासण्यासाठी कोणत्याही बाजूचे वर पासून तळापर्यंतचे माप घ्यावे.

 

जर ते माप ७.१० मीटर्स इतके भरले तर याचाच अर्थ उतार हा योग्य रीतीने केला गेला आहे.

शेततळ्यामध्ये पेपरचे आच्छादन करावे का?

एकदा का तळ्याचे खोदकाम पूर्ण झाले, दोन पर्याय शक्य आहेत.
तळ्याचा प्राथमिक उद्देश जर पुनर्भरण असेल तर तळ्याच्या तळाला तसेच काहीही आच्छादन न करता सोडून द्यावे जेणेकरून पाणी जमिनीच्या भू-गर्भात झिरपेल.

 

हल्ली बरेचदा पाणी सुरक्षेच्या हमीसाठी शेतकरी शेततळी बांधतात.
या प्रकारच्या तळ्यांमध्ये पाणी साठून राहावे म्हणून प्लास्टिकच्या कागदाचं आच्छादन करणं गरजेचं आहे.
हा एक विशिष्ट कागद आहे ज्याची जाडी ५०० मायक्रोन इतकी असायला हवी.
हा पुरेसा टिकाऊ आणि मजबूत असायला हवा जेणे करून तो सहजरीत्या फाटणार नाही.
सरकारी मान्यता असलेल्या कंपनीने पुरवलेलाच पेपर वापरावा कारण ते ७ वर्षांची हमी/ गॅरंटी देतात.

पेपरचे आच्छादन कसे करावे?

पेपर जेंव्हा पाणी या तळ्यात शिरतं या कागदावर पाण्याचा दाब येतो.
जमिनीवरल्या अणकुचीदार किंवा दातेरी कडांच्या दगडांनी कागद फाटू शकतो.
म्हणून तळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यावर आपण प्रथम तळ्याचा पृष्ठभाग चिखलाचा चांगला थर देवून आच्छादुन टाकू. 
पेपरचे प्रत्यक्ष आच्छादन हे ती कंपनी करून देईल जी पेपरचा पुरवठा करेल.
तो खाली पकडून ठेवण्यासाठी चर खोदला गेला ज्याच्यात तो ठेवलेला राहील.
तो एका जागेवर भक्कमपणे जमिनीस पकडून स्थिर राहील यासाठी त्याच्यावर माती आणि वजनी दगड ठेवले गेले. ज्यामुळे तो जोराच्या वाऱ्यामुळे किंवा पावसामुळेही जागेवरून हलणार नाही.
जनावरे जसे की कुत्रे किंवा गाईगुरांपासूनही या कागदाला सांभाळाव लागेल. ते तळ्यात शिरून कागद हलवू शकतील किंवा फाडू शकतील.
याकरीता तळ्याच्या चारही बाजूना मजबूत कुंपण उभारावे लागेल जे या जनावरांना तळ्यापासून यशस्वीरीत्या दूर ठेवेल.

पेपर आच्छादनामध्ये शेतकऱ्याची भूमिका काय असेल?

तळ्याच्या तळावर हा पेपर अच्छादून देण्याची जबाबदारी कंपनीची असेल.
याकामी लागणारी मजूरी अंदाजपत्रकात अंतर्भूत असेल.
पेपर हा बरोबर ५०० मायक्रोन जाडीचाच आहे याची खात्री मात्र शेतकऱ्याने करून घेण गरजेचं आहे.
या कागदावर ISI चिन्ह असल्याचं आणि सरकारमान्य कंपनीकडूनच हा पुरवठा झाला असल्याबद्दलही शेतकऱ्याने तपासून घ्यावं.
पेपर सप्लायरला पेपरची पूर्ण रक्कम आधीच देवून टाकू नये.
पेपर पसरवून झाल्यानंतर जर पेपरमधून गळती होत असल्यास कंपनीकडून त्याची दुरुस्ती करवून घेणे हे तुमच्यासाठी अवघड होवून बसेल.
पेपर पसरवून झाल्यावर एका महिन्याच्या आत त्यावर पाणी जमा करणे आवश्यक आहे.
पेपर जर सूर्याच्या उन्हात पाण्याशिवाय जास्त काळ उघडा राहिला तर त्याच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो.
पेपर ऑगस्ट महिन्यात, पावसाचा पहिला टप्पा पार पडल्यावर पसरवणे हे आदर्शवत असेल.
पावसाचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी तो पाण्याने भरला जाईल.
वैकल्पिकरित्या, डीजेल किंवा विजेवर चालणारा पंप वापरून पाणी उपसा करून तळ्यात भरू शकतो.
वाफेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने होणाऱ्या नुकसानाचे काय?
जास्त कालावधीपर्यंत जेंव्हा तळ्यात पाणी राहिल तेंव्हा बरेच पाणी हे बाष्पीभवनामुळे वाफ होईल.
हे कमी करण्याकरिता अनेक पध्दती वापरता येतील.
काही शेतकरी कोलीन नावाच्या रसायनाचा वापर करतात, पाण्याच्या पृष्ठभागावर हे रसायन तेलासारख पसरवतात.
समस्या अशी आहे की जर एखाद्याने हे रसायन वापरलं तर ते या पाण्यात मस्यशेती करू शकत नाही कारण हे रसायन माश्यांसाठी विषारी असतं. 
पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्याचा दुसरा मार्ग आहे तळ्यात पक्षीपालन करणे.
तरंगत्या पृष्ठभागावर पिंजऱ्यात कोंबडीची पिल्ले ठेवल्यास त्यामुळे पाण्याला सुर्यकिरणांपासून वाचवता येईल. 
यामुळे ५०% इतकं पाणी बाष्पीभवन होण्यापासून वाचवता येईल.
पक्षांची विष्ठा पाण्यात पडेल आणि पाण्यातील मासे ते खातील.
हा एक नाविन्यपूर्वक उपाय होईल.
पक्षी पालन आणि मस्य पालनापासून शेतकऱ्याला चांगली मिळकत तर मिळेलच पण विष्ठामिश्रीत पाण्यामुळे पाणी पोषकतत्वयुक्त होईल आणि पिकांसाठी ते आदर्शवत असेल.

श्रमदानासाठी सरकारच्या काय योजना आहेत?

शेततळ्यासाठी निधीपुरवठा करणाऱ्या तीन सरकारी योजना आहेत.
यातली पहिली योजना आहे ‘मनरेगा’, ज्यात फक्त शेततळे खोदण्याचा खर्च भरून मिळतो.
या योजने अंतर्गत पहिले एक मीटर पर्यंतचे खोदकाम हे हाताने करणे अनिवार्य आहे.
खडकाळ जमीन किंवा कठीण जमिनीमुळे जर हे शक्य झाले नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दुसरी योजना आहे ‘मागेल त्याला शेततळं योजना’
यात तुम्हाला यंत्राद्वारे काम करण्याची परवानगी आहे आणि रुपये पन्नास हजार इतकी सबसिडी दिली जाते.
शेततळं खोदण्यासाठी प्रत्यक्ष खर्च चाळीस ते पन्नास हजार इतका येतो
म्हणून उरलेली चाळीस ते पन्नास हजारांची रक्कम शेतकऱ्याला स्वतःला खर्च करावी लागेल.
नॅशनल हॉर्टीकल्चर मिशनच्या अंतर्गत ही तिसरी योजना आहे जी शेततळ्यासाठी निधी पुरवते.
या योजने अंतर्गत अर्धे खोदलेले तळे हे मान्यताप्राप्त डिझाईन आहे.
या नमुन्यामध्ये तळे जमिनीत दोन मीटर खोल खोदले जाते आणि खोदलेल्या मातीचा अधिकचा तीन मीटर उंच ढीग लावला जातो.
या योजनेत १००टक्के निधी पुरवठा होतो, यात खोदकाम, पेपरचा खर्च आणि कुंपणखर्च अंतर्भूत आहे.
पण या योजनेची अट अशी आहे की हे शेततळे सामुदायिक तळे असावे.
एकट्या शेतकऱ्याला या योजनेमधून निधी मिळत नाही. कमीत कमी दोन किंवा अधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावा.
दुसरी अट अशी की तळ्याच्या पाण्यातून सिंचन केलेल्या जमिनीत शेतकऱ्याने फलोत्पादन, भाज्या किंवा फुलांची रोपांची लागवड करावी.
या दोन्ही अटी पूर्ण झाल्यास पाच लाख छप्पन्न हजार इतकी रक्कम ४४ x ४४ x ५ मीटर इतक्या आकाराचे तळे बांधण्यासाठी मिळते.

शेततळ्यात साठवलेले पाणी कसे वापरले जाऊ शकेल?

शेततळं हे शेतापेक्षा उंच भागात असेल तर पाणी हाताने सायफन पद्धतीने वापरात आणले जाऊ शकते.
जर तुमचे शेततळं हे तुमच्या शेतापेक्षा खालच्या पातळीत असेल तर तुम्हाला विजेवर चालणारा किंवा डीजेल पंप वापरावा लागेल.
लक्षात ठेवा शेततळ्यातील पाणी हे मर्यादित आहे आणि त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून व्हायला हवा.
कमी पाण्याची गरज असणारे फलोत्पादन लागवड, भाज्या आणि फुलशेतीला प्राधान्य दिला गेला पाहिजे.
सिंचन हे ठिबक सिंचन पध्दतीने केले जावे ज्यामुळे पाण्याचा वापर जास्त कार्यक्षमतेने होईल.
दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हे शेततळे बांधत आहेत.
तुम्ही निधीकरिता सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास शेततळ्या सारखी रचना कमीत कमी खर्चात बांधून होईल.
जेंव्हा पाउस चुकारपणा करेल तेंव्हा सच्च्या मित्राप्रमाणे शेततळे शेतकऱ्यांच्या मदतीस येईल.
तो या शेततळ्यावर अवलंबून राहू शकतो की त्याचे पिक कधीही वाया जाणार नाही आणि तो त्याच्या शेतातून भरघोस पिक घेवू शकतो

रेशीम शेती

रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी उच्च दर्जाची कोषनिर्मिती करून चांगला दर मिळवू लागले आहेत. मराठवाड्याने यात विशेष आघाडी घेतली आहे. नर्सरीपासून ते तुतीलागवड, चॉकी व रिलींग युनीट या टप्प्यापर्यंतचे तंत्रज्ञान वापरात आले आहे. रेशीम विभागाचे मार्गदर्शन त्यांना लाभते आहे.  मागील पाच वर्षापांसून रेशीम शेती तंत्रज्ञानाबाबतीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर मागणी असलेल्या बायव्होल्टाईन या सुधारित रेशीम कीटक वाणाचा वापर राज्यात ९० ते १०० टक्के प्रमाणात होतो. कोष उत्पादनात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. पारंपरिक व सर्वाधिक रेशीम कोषाचे उत्पादक असणाऱ्या कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकले आहे. यात मराठवाड्याने रेशीम शेतीने चांगली आघाडी घेतली आहे. औरंगाबाद येथील विभागीय रेशीम  कार्यालयाचे त्यांना तंत्रज्ञान मार्गदर्शन मिळत आहे. महा रेशीम अभियान २०१७ पासून  राबविण्यात येत असून असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे आहे तंत्रज्ञान  सुधारित जातीचा वापर पूर्वी एम-५,  एस-३६, एस ५४ आदी तुतीच्या जाती उपयोगात आणल्या जायच्या. त्याचीं उत्पादकता २० ते ३० टन प्रति हेक्‍टर होती. आता व्ही-१ जातीचा वापर सुरू केल्याने उत्पादकता हेक्टरी ६० टन ते त्याहून जास्त मिळत आहे. जातीचे फायदे 

पाल्याची प्रत अळयांच्या वाढीसाठी योग्य.
चॉकीसाठीही योग्य जात 
पाला लवकर सुकत नाही.
मुळे फुटण्याचे प्रमाण जास्त.
नर्सरी  पूर्वी कर्नाटक राज्यातून बेणे आणून जून-जुलैमध्ये लागवड व्हायची. त्यामध्ये वाहतुक खर्च एकरी १५ हजार रुपये लागायचा. उगवन क्षमता कमी असायची. आता शेतकऱ्यांनाच नर्सरीचे तंत्रज्ञान सांगण्यात आले आहे. त्यातून जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नर्सरीत लागवड होते. जूनच्या दरम्यान मुख्य शेतात पुनर्लागवड होते.  फायदे 

मुख्य शेतात लागवडीनंतर अडीच महिन्यांत पाला मिळायला सुरुवात. त्यामुळे सप्टेंबरच्या दरम्यान बॅच सुरू करून लवकर उत्पन्न सुरू होते.  
तुतीचा शेतातील पूर्णवाढीचा काळ कमी होऊन नर्सरीत विभागला जातो. 
 कीटक संगोपन गृह 

तीन लाख रुपये गुंतवणूकीत शास्त्रीय पध्दतीचे कीटक संगोपनगृह उभारता येते. त्यात तापमान, ‘स्पेसिंग’, वायुविजन, आर्द्रता, या बाबी नियंत्रित करता येतात.
६० बाय २२ किंवा ५० बाय २२ आकाराचे शेड, खाली कोबा,  तीन फुटाची भिंत घेऊन हिरवी जाळी लावता येते. हंगामानुसार शेडमध्ये याप्रमाणे वातावरण ठेवता येते. 
त्याचे फायदे 

शेडसाठीचा खर्च कमी होतो. 
रॅकवरील फांदी पद्धतीमुळे मजुरी खर्चात बचत 
एका वेळी जास्त अंडीपुंज घेणे शक्य. 
निर्जंतुकीकरण करणे सोपे 
तुती लागवड क्षेत्र वाढविणे शक्‍य  
चॉकी  म्हैसूर येथे तीन महिन्याचे प्रशिक्षण देऊन चॉकीधारक तयार केले जात आहेत. त्यामुळे तापमान, आर्द्रता, वायुविजन, प्रकाश, ‘इनक्‍युबेशन’, ‘ब्लॅक बॉक्‍सिंग’, वाहतूक आदी बाबी काटेकोरपणे पालणे शक्य होत आहे.  फायदे

कोष उत्पादकता वाढण्याच्या अनेक कारणांपैकी चॉकी व्यवस्थापन कारणीभूत.
कोष निर्मितीचा कालावधी १० दिवसांनी कमी झाला. 
रेशीम उत्पादकांना कमी वेळेत योग्य तंत्राच्या आधारे चॉकी अळ्या घरपोच देणे शक्य झाले.  
कोष उत्पादन व धागा   पूर्वी संकरित (क्रॉस ब्रीडर) वाणापासून प्रति १०० अंडीपुंज उत्पादन ४० ते ५० किलो मिळायचे. बायव्होल्टाइन वाणामुळे हेच उत्पादन ६० ते ८० किलो मिळते. तंत्रज्ञानामुळे जागतीक बाजारपेठेत जास्त दर असलेल्या एकहजार मीटरपेक्षा जास्त लांबीच्या धाग्याची निर्मिती शक्‍य होत आहे.  शेतकऱ्यांना त्याचा जास्त परतावा मिळतो. पारंपरिक वाणांपासूनच्या धाग्यांची लांबी ४५० मीटरपर्यंत मिळते.  कोष खरेदी व प्रक्रिया 

सध्या जालना, सोलापूर येथे कोष खरेदी विक्री केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेत
बारामती, पूर्णा, पाचोड,जालना, जयसिंगपूर येथे कोष खरेदी केंद्रे 
त्यामुळे विक्रीसाठी अन्य राज्यात जाण्याची आवश्‍यकता नाही.
उच्च प्रतीच्या रेशीम धागा निर्मितीसाठी जालना,भंडारा व सांगली येथे स्वयंचलित ‘रिलिंग मशिनरी’ चे युनिट. पैठणीसाठी आवश्‍यक चांगल्या प्रतीचे सूत महाराष्ट्रातच तयार होत आहे.
कोषाला प्रति किलो ३०० रूपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास राज्य शासनाकडून प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याची सुविधा
अर्थकारण एक एकर तुती बागेवर आधारित २०० अंडीपुंजांचे संगोपन करता येते. व्यवस्थापन व कीटक संगोपनात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यातून १५० ते १६० किलो कोषांचे उत्पादन होते. त्यास किलोला २५० रूपयांपासून ते कमाल ४५० रुपये दर मिळू शकतो. वर्षभरात सुमारे चार बॅचेस होतात. प्रति बॅच २१ ते ३० दिवसांत पूर्ण होते. रेशीम कोष उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे.    तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने मराठवाडा रेशीम क्रांतीच्या दिशेन वाटचाल करते आहे. या उद्योगाने शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे. - दिलीप हाके